Union Budget 2026
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सराकरची आर्थिक कर्तव्य स्पष्ट केली. तसेच कर्तव्य भवनात तयार होणारा पहिला अर्थसंकल्प असल्याचेही यावेळी स्पष्ट केली. जाणून घेवूया सरकारची अर्थसंकल्पातील तीन कर्तव्य
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी विशेष युवा-केंद्रित अर्थसंकल्पाचा पाया रचला. गरीब, शोषित आणि वंचितांवर लक्ष केंद्रित करण्याची सरकारची वचनबद्धता आहे. कार्तव्य भवनात तयार होणारा हा पहिला अर्थसंकल्प आहे.
आमचे पहिले कर्तव्य म्हणजे जलद आणि शाश्वत आर्थिक विकास राखणे.
आमचे दुसरे कर्तव्य म्हणजे आपल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या क्षमता विकसित करणे.
आमचे तिसरे कर्तव्य म्हणजे "सबका साथ, सबका विकास" या दृष्टिकोनानुसार विकास साध्य करणे.
अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या त्रिस्तरीय दृष्टिकोनासाठी सहाय्यक वातावरण आवश्यक आहे. आमची पहिली आवश्यकता म्हणजे संरचनात्मक सुधारणांची अनुकूल आणि प्रगतीशील गती राखणे. दुसरी आवश्यकता म्हणजे कार्यक्षम भांडवल वाटप आणि चांगल्या जोखीम व्यवस्थापनाचा पाया रचणे. तिसरी आवश्यकता म्हणजे सुशासनाला पाठिंबा देण्यासाठी एआय अनुप्रयोग आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे.
आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, "नोकऱ्यांची निर्मिती आणि विकासाला गती देण्यासाठी आम्ही व्यापक सुधारणा हाती घेतल्या आहेत. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर, आम्ही ३५० हून अधिक आर्थिक सुधारणा सुरू केल्या आहेत." जीएसटीचे सरलीकरण आणि कामगार संहितेची अधिसूचना या सुधारणांचा एक भाग आहे. शिवाय, केंद्र आणि राज्य सरकारांनी उच्चस्तरीय समित्या स्थापन करून एकत्र काम केले आहे. सुधारणांची तीव्रता वेगाने वाढत आहे.