राजगुरूनगर/कडूस : पुढारी वृत्तसेवा : खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या ८.५३ टिएमसी क्षमता असलेले चासकमान धरणात ९०.२१ टक्के म्हणजेच एकूण ७.७९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा ६.८३ टीएमसी असून धरणात सुमारे ५ हजार क्युसेक पाण्याची आवाक होत आहे. त्यामुळे भिमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासह भीमाशंकर अभयारण्य व चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसाने भीमा नदी व आरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. चासकमान धरण साखळीत १ जून पासून एकूण २९४ मिलिमिटर तर मागील २४ तासांत २५ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणाची पाणी पातळी ६४८.३६ मीटर आहे. तर एकूण साठा २२०.७० दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त साठा १९३.५१ दशलक्ष घनमीटर झाला आहे. तसेच कळमोडी धरण दि. १६ जुलै रोजी १०० टक्के भरले असून कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार बँटिंग चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत एकून ७५५ मिलिमीटर तर मागील २४ तासांत २८ इतकी नोंद करण्यात आली आहे. कळमोडी धरणातून १२०० क्युसेक वेगाने पाणी आरळा नदीद्वारे चासकमान धरणाला मिळत असून धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
चासकमान धरणात येणाऱ्या कमी-जास्त विसर्गानुसार अतिरिक्त पाणी मंगळवारी (दि. २५) धरणाच्या विद्युत विमोचकाद्वारे डाव्या कालव्यात सुमारे ३०० क्युसेक सोडण्यात आले होते. धरण साखळीत पावसाचा जोर कायम राहिल्याने बुधवारी (दि.२६) रोजी संध्याकाळी सात वाजता १०० क्युसेकने वाढविण्यात तर गुरुवारी (दि. २ रात्री ८ वाजता पुन्हा १०० क्युसेकने असा एकूण ५०० क्युसेकने सूरू आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत विशेषतः भिमनेर खोऱ्यात पावसाचा जोर वाढल्याने ओढे, नाले दुथडी भरून वाहात आहे. यामुळे खबरदारी व पाणलोट क्षेत्रांत संभाव्य पावसाची शक्यता गृहित धरून धरणाच्या सांडव्यावरून केव्हाही भीमा नदीपात्रात प्रवाह सोडण्यात येणार आहे. त्या पाण्याचा अंदाज करता येणार नाही. धरण लवकरच पुर्ण क्षमतेने भरणार असल्याने खबरदारी म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, काही साधन साहित्य असल्यास हलवावे, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा :