Latest

Love Crime : धक्कादायक! तिसऱ्या पतीनं प्रेम सिद्ध कर म्हटलं; तिनं स्वतःच्या मुलीलाच जिवंत जाळलं

backup backup

चेन्नई, पुढारी ऑनलाईन : आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी ३८ वर्षांच्या महिलेने स्वतःच्या मुलीचा बळी दिला. संबंधित महिलेने तिसरे लग्न केलेले होते. दुसऱ्या लग्नात तिला मुलगी झालेली होती. तिसऱ्या पतीने आपल्यावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी महिलेला सांगितले. संबंधित महिलेने प्रेमासाठी स्वतःच्या मुलीला जिवंत जाळले. (Love Crime)

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार ७५ टक्के मुलगी भाजली होती. दुर्दैवाने त्या मुलीचा अंत झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ही घटना घडली आहे. पती आणि पत्नी यांच्यामध्ये भांडणं झाले होते. पतीने आपल्या पत्नीला म्हणजेच जया लक्ष्मीला आपल्या प्रेम सिद्ध करण्यासाठी सांगितले. आपल्या पतीवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी बावळटपणा करू लागली.

या वादात संबंधित महिला म्हणू लागली की, "या मुलीला पेटवूट देते. माझं प्रेम जर खरं असेल तर, तिला काहीच होणार नाही. ती आग तिचं काहीही करू शकणार नाही." त्यानंतर जया लक्ष्मी आपल्या खोलीमध्ये गेली आणि मुलीला घेऊन आली. तेव्हा गाढ झोपलेल्या मुलीवर राॅकेल टाकून पेटवून दिले.

त्यानंतर आगीचा त्रास सहन होत नसल्यामुळे ती लहान मुलगी किंचाळू लागली. तिच्या आवाजाने आजुबाजुचे लोक धावत आले. पण, तोपर्यंत मुलगी मोठ्या प्रमाणात जळून गेलेली होती. लोकांनी भाजलेल्या मुलीला रुग्णालयात भरती केले. त्यात ती ७५ टक्के भाजलेली होती, त्यामुळे तिचा दुर्दैवाने अंत झाला. (Love Crime)

समोर आलेल्या माहितीनुसार जयालक्ष्मीचे पहिले लग्न १९ व्या वर्षी झालेले होते. तिच्या पतीचं नाव पलवान होते. त्यानंतर तिने आपल्या दीरासोबक लग्न केले आणि पलवानला सोडचिठ्ठी दिली. काही दिवसानंतर त्यालाही तिने सोडून दिले आणि घटस्फोटीत ड्रायव्हर पद्मनाभ नावाच्या व्यक्तीसी लग्न केले. ९ वर्षांपूर्वी तिने हे लग्न केलेले होते आणि त्यांना दोन मुलेही झालेली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT