Latest

Dhananjay Mahadik : केंद्रीय अर्थसंकल्प सहकार क्षेत्रासाठी क्रांतिकारक : धनंजय महाडिक

अविनाश सुतार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्यावतीने अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (दि.१) देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प, सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील नागरिकांना आणि उद्योगांना न्याय देईल, असा आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प म्हणता येईल. विशेषतः सहकारी साखर कारखानदारांचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला इन्कम टॅक्सचा प्रश्न आज निकाली काढला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)  यांनी दिली.

२०१६ पूर्वी देशातील अनेक कारखान्यांना आलेल्या आयकर खात्याच्या नोटिसा किंवा थकबाकीबद्दल झालेल्या कारवाई यातून दिलासा मिळाला आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात सहकारी साखर कारखानदारीसाठी १० हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अधिक रक्कम शेतकर्‍यांना दिली, ती रक्कम कारखान्याचा नफा समजून आयकर लादला गेला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने अडचणीत आले होते. परंतु या निर्णयाचा सहकारी साखर कारखान्यांना आणि पर्यायाने शेतकर्‍यांना लाभ होणार आहे,असेही महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी सांगितले.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील सहकारी विकास सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी सुमारे २० प्रकारचे अधिकार प्रदान केले आहेत. त्यातून ग्रामीण भागात गोदाम, कोल्ड स्टोरेज, जल जीवन योजना यासारखे उपक्रम राबवण्यासाठी मदत होणार आहे. परिणामी सहकार क्षेत्राची मजबुती होणार आहे. त्यातून सहकारातून समृद्धी साकारणार आहे. त्यामुळेच यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सहकार क्षेत्रासाठी क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT