बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात शेतामध्ये काम करत असताना एका दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज (शनिवार) शाहूनगर येथे वीजेचा धक्का लागून आजी, आजोबांसह आठ वर्षीय नातीचा दुर्देवी मृत्यू झाला.
सदर कुटुंब मूळचे रामदुर्ग तालुक्यातील अरंबीचा तांडा येथील आहे. शाहूनगर मध्ये इमारतीचे बांधकाम चालू असून, या ठिकाणी राठोड कुटुंबीय वॉचमनचे काम करत होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणी तापवण्यासाठी लावण्यात आलेली कॉइल शॉर्ट सर्किट झाल्याने विजेचा धक्का बसून, इराप्पा गणपती राठोड (वय ६२), शंतव्वा इराप्पा राठोड (वय ५५), अन्नपूर्णा हुनाप्पा राठोड (वय ८) या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली असून, जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे.
हेही वाचा :