संग्रहित छायाचित्र 
Latest

येवला : अवकाळी पावसाने गारठून तब्बल ४८ मेंढ्या आणि तीन वासरे मृत्यूमुखी

backup backup

येवला; पुढारी वृत्तसेवा

थंडीची सुरुवात आणि त्यात अचानक बेमोसमी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व मेंढापाळांचे मोठे नुकसान होत आहे. गुरुवारी या वातावरणाचा मुक्या जनावरांना देखील फटका बसताना दिसत आहे.

येवला तालुक्यातील सोमठानदेश या गावातील राजाराम बाळू सोनवणे व दशरथ चंद्रभान सोनवणे यांच्या प्रत्येकी सहा अशा एकूण १२ मेंढ्या, तर राजापूर येथील राजाराम तुकाराम वाघमोडे यांच्या २४ मेंढ्या, भारम येथील रतन कारभारी लवंगे यांच्या ५ मेंढ्या , पिंपलखुटे येथील ३ संतोष सारवंद दहीने यांच्या ७ मेंढ्या तर कुसुमाडी येथील गोरख तुकाराम बारहाते यांची ३ वासरे या अवकाळी पावसाने व वातावरणात झालेल्या गारव्यामुळे गारठून मृत्यूमुखी पडली आहेत.

या सदर्भात तहसीलदार प्रमोद हिले, पालकमंत्री भुजबळ यांचे स्विय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करून शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून नियमानुसार मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT