File photo  
Latest

दुर्दैवी ! बटाट्याचा पाला खाल्ल्याने विषबाधा होऊन ११ कालवडींचा मृत्यू

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  नागापूर (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत बटाट्याचा पाला खाल्ल्याने विषबाधा होऊन ९ कालवडी व दोन गायींचा मृत्यू झाला. राजू करमन बरवाड या राजस्थानी गोपालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. राजस्थानी गोपालक राजू करमन बरवाड हे नागापूर गावाच्या हद्दीत गेली २५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. थोरांदळे गावात अनेक शेतांमध्ये सध्या बटाटा काढणीची कामे वेगात सुरु आहेत. राजू बरवाड यांनी एका बटाटा शेतात कापून ठेवलेला पाला गायींसाठी आणला. त्यानंतर तो पाला गायी-कालवडींनी खाल्ल्यानंतर त्यातून त्यांना विषबाधा झाली. रात्री उशिरापर्यंत ९ कालवडी आणि २ गायी मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्यावर वळती येथिल पशूधन वैद्यकीय अधिकारी ए. डी. परांडेकर, ए. एम. महाकाळ यांनी उपचार केले.

संबंधित बातम्या :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT