

बेशिस्त वाहतूक, असुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात प्राण गमावणार्या पादचार्यांची संख्या भयावह आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात 37 हजार 385 अपघातांमध्ये 40 हजार 321 नागरिकांनी जीव
गमावला आहे. यापैकी सर्वाधिक अपघात हे मुंबई आणि ठाण्यात झाले आहेत.
महामार्गावर बेफाम वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. रस्त्यांच्या बाजूला फेरीवाले, अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने यामुळेही अपघात होतात. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी महामार्गावर स्कायवॉक आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत, मात्र त्यांचा वापर करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर 14 हजार 58 अपघात 15 हजार 224 जणांनी जीव गमावला.
राज्य महामार्गावर 6 हजार 902 अपघात झाले असून त्यामध्ये तीन हजार 820 जणांनी जीव गमावला.
इतर रस्त्यांवर 17 हजार 64 अपघात झाले असून
6 हजार 481 जणांनी जीव गमावला.