

नवी दिल्ली : भात हा जगातील अनेक देशांमधील लोकांचा प्रमुख आहार आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तांदळाचे मोठे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते हे तुम्हाला ठावूक आहे का?
आशियामध्ये एकूण 693,278.2 हजार मेट्रिक टन तांदूळ उत्पादन झाले होते. यात भारताने 217,867.86 हजार मेट्रिक टन उत्पादन घेतले. जे एकूण उत्पादनाच्या 26.52 टक्के इतके आहे. त्यानंतर चीनने 209,173.00 हजार मेट्रिक टन उत्पादन करत 25.46 टक्के हिस्सा मिळवला. हे दोन्ही देश मिळून जागतिक धान उत्पादनाचा मोठा भाग निर्माण करतात. इतर देशांमध्ये बांगला देशने 60,570.45 हजार मेट्रिक टन, इंडोनेशियाने 53,142.73 हजार मेट्रिक टन आणि व्हिएतनामने 43,450.45 हजार मेट्रिक टन धानाचे उत्पादन केले.
थायलंड, म्यानमार, फिलिपाइन्स, पाकिस्तान आणि कंबोडिया हे देखील प्रमुख उत्पादक देशांमध्ये समाविष्ट आहेत. थायलंडचे उत्पादन 33,551.34 हजार टन, म्यानमारचे 27,650.00 हजार टन, फिलिपाइन्सचे 19,087.14 हजार टन, पाकिस्तानचे 14,585.23 हजार टन आणि कंबोडियाचे 14,200.00 हजार टन इतके नोंदवले गेले. या आकडेवारीनुसार भारत हा आशियातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला आहे.
भारताने 2024 मध्ये 217,867.86 हजार मेट्रिक टन धानाचे उत्पादन केले, जे एकूण उत्पादनाच्या 26.52 टक्के इतके आहे. भारताचे हवामान आणि नद्यांचे जाळे धान उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल आहे. भारतामध्ये उत्तर प्रदेश हे धान उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धान शेतीसाठी अनुकूल वातावरण मिळते. सुपीक जमीन आणि नद्यांची उपलब्धता यामुळे येथे तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उत्तर प्रदेशला भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य मानले जाते.