Winter Water Intake: थंडीत कमी पाणी पिल्याने किडनी, मेंदूवर दुष्परिणाम

500 मिलिपेक्षा कमी पाणी पिल्यास शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते
Winter Water Intake: थंडीत कमी पाणी पिल्याने किडनी, मेंदूवर दुष्परिणाम
Published on
Updated on

नवी दिल्ली : सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते आणि दुसरीकडे लोक पाणी पिण्याचे प्रमाणही कमी करतात. काही लोक तर थंडीत पाणी पिण्याचा कंटाळाही करतात. यामुळे, शरीराची पाण्याची गरज पूर्ण न झाल्यामुळे अनेक गंभीर नुकसान होऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात पाणी कमी पिल्याने त्याचा किडनी व मेंदूवर दुष्परिणाम होतो. थंडीत किती पाणी पिणे आवश्यक आहे आणि कमी पाणी पिल्याने आरोग्यावर कोणते वाईट परिणाम होतात, हे जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ दररोज 500 मिलिपेक्षा कमी पाणी पिल्यास शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरात पाण्याची कमतरता सर्वात आधी किडनीवर परिणाम करते. पाणी कमी पिल्याने किडनीची फिल्ट्रेशन प्रक्रिया (गाळण्याची क्रिया) मंदावते. यामुळे लघवी जाडसर आणि गडद रंगाची येते, याचा अर्थ लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या स्थितीत शरीरातील विषारी घटक बाहेर पडू शकत नाहीत आणि किडनीचे नुकसान होते.

जेव्हा शरीराची पाण्याची गरज पूर्ण होत नाही, तेव्हा रक्ताचे प्रमाण कमी होते, म्हणजेच रक्त दाट होते. यामुळे मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. या स्थितीत थकवा, मूड स्विंग आणि एकाग्रता ठेवण्यात अडचण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल, तर तुमच्या स्नायूंना मिळणारी ऊर्जा कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो. शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम पचनावर होतो. पचनक्रियेत पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. पाण्याची मात्रा कमी झाल्यास बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news