

नवी दिल्ली : आपल्याला स्वतःच्याच शरीराची व त्यामधील विविध अवयवांच्या कार्यांची नीट माहिती असत नाही. आपण अनेकदा ऐकतो की, हृदय हे शरीराचा ‘पंप’ आहे, जे संपूर्ण शरीराला रक्त पुरवते. पण, तुम्हाला माहिती आहे का, की हृदय रक्त स्वच्छ करत नाही? हे काम आपल्या शरीरातील आणखी एका महत्त्वाच्या अवयवाद्वारे, मूत्रपिंडाद्वारे केले जाते. हृदय हा एक स्नायूचा अवयव आहे, जो सतत धडधडत असतो. त्याचे मुख्य कार्य संपूर्ण शरीरात रक्त पंप करणे आहे. हे रक्त शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे वाहून नेते तसेच कार्बन डायऑक्साइड आणि इतर टाकाऊ पदार्थ फुफ्फुसे आणि मूत्रपिंडांमध्ये परत घेऊन जाते. मूत्रपिंडाचे कार्य कसे चालते, हे जाणून घेऊया...
मूत्रपिंड हे खालच्या ओटीपोटात स्थित अवयवांची जोडी आहे. मूत्रपिंडाचे मुख्य कार्य म्हणजे रक्त फिल्टर करणे. ते रक्तातील टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि मीठ काढून टाकते आणि मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकते. मूत्रपिंडांमध्ये नेफ्रॉन नावाचे छोटे फिल्टर असतात. मूत्रपिंडांमधून रक्त जात असताना, नेफ्रॉन रक्तातील टाकाऊ पदार्थ वेगळे करतात. हे टाकाऊ पदार्थ लघवीच्या स्वरूपात मूत्राशयात जातात आणि नंतर शरीराबाहेर टाकले जातात. आपल्या शरीरासाठी मूत्रपिंड खूप महत्त्वाचे आहेत. ते रक्त शुद्ध करून आपले शरीर निरोगी ठेवते. जर मूत्रपिंडे योग्यरीत्या कार्य करत नसतील तर रक्तात टाकाऊ पदार्थ जमा होतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, अशक्तपणा आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. मूत्रपिंडांची अशी काळजी घ्यावी...
पुरेसे पाणी प्या : पाणी मूत्रपिंडांना रक्त फिल्टर करण्यास मदत करते.
मिठाचे सेवन कमी करा : जास्त मीठ सेवन केल्याने मूत्रपिंडांवर दबाव येतो.
निरोगी आहार घ्या : फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खा.
नियमित व्यायाम करा : व्यायामामुळे मूत्रपिंड निरोगी राहतात. नियमित
तपासणी करा : मूत्रपिंडाच्या समस्या वेळेवर ओळखण्यासाठी नियमित तपासणी करा. निरोगी जीवनशैली आणि नियमित तपासणी करून, आपण आपले मूत्रपिंड निरोगी ठेवू शकतो आणि आपले शरीर निरोगी ठेवू शकतो.