पुणे :अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्य ऑनलाईन सोहळा संपन्न 

Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित तिसरे अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्य ऑनलाईन संमेलन रविवारी (दि.४)  साहित्यिक अमोल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

साहित्य संमेलन ही वैचारिक बैठक असून समाजमना उभारी देणारी असतात. साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देते, असे विचार संमेलनाध्यक्ष अमोल बागुल यांनी मांडले. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्शवादी युगपुरुष असून सामाजिक विषमतेची तौलनिक वैचारिक मांडणी त्‍यांनी विशद केली.

वाचा : पुणे : पाटस येथे डोक्यात दगड घालून दोन तरुणांची निर्घृण हत्या

उपेक्षित वंचिताना हक्क साहित्यांतून मांडून न्याय मिळेल. तसेच परिषदेच्या माध्यमातून शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य कोट्यातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदारपद मिळालं पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. साहित्य संमेलनातून सामाजिक समता, बधुता व न्याय मिळावा, विषमतेचे दरी नष्ट व्हावी. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत उदघाटक नात्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्‍यक्‍त केले. 

वाचा : बोल दिंडीकर्‍यांचे : संतांच्या विचारांची अनुभूती देणारी वारी

यावेळी परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, राष्ट्रीय विश्वस्त सुवर्णा पवार, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, विदर्भ अध्यक्ष आनंद शेंडे, व सूत्रसंचालन मुंबई प्रदेश अध्यक्ष राजश्री बोहरा यांनी केले. या संमेलनात चाळीसहून आधिक कवींनी सहभाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news