प्रहार संघटना घालणार आज पालकमंत्र्यांचे श्राद्ध | पुढारी

प्रहार संघटना घालणार आज पालकमंत्र्यांचे श्राद्ध

सेालापूर : पुढारी वृत्तसेवा उजनीतील पाणी पळविण्याचा डाव पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. तो उधळून लावणार असल्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचेे अजित कुलकर्णी यांनी दिला. याविषयी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असून त्याचा प्राथमिक भाग म्हणून शुक्रवारी गणपती घाटावर पालकमंत्र्यांचा दशविधी करणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूराला घेवून जात आहात याचे थोडेतरी काही वाटायला हवे.

पालकमंत्री सोलापूरचे आणि विकास कामे मात्र इंदापूर, बारामतीचे हा प्रकार बंद करा.आता तुमच्या विरोधात आता प्रहार शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. याची दखल तुम्हाला घ्यावी लागेल, असे कुलकर्णी म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना सध्या अर्धवट आहेत.सोलापूरकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यासाठी आपण कधी धडपड केली नाही. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कधी पुढाकार घेतला नाही. केवळ इंदापूर आणि बारामतीच्या पाण्यासाठी आपण धडपडत आहात. हे योग्य नाही. त्यामुळे आपला पवित्रा बदला अन्यथा संघटनेला आता आपल्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button