नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला बारा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कचरा व्यवस्थापन करण्यात आलेल्या अपयशाचे कारण देत हा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे याआधी लवादाने याच कारणासाठी प. बंगाल सरकारला साडेतीन हजार कोटी रुपयांचा दंड केला होता.