'लॉर्ड' शार्दुलचा जलवा! ६ चेंडूत मुंबईच्या तोंडातून विजय हिरावला

Shardul Thakur | लखनौ सुपर जायंट्सचा १२ धावांनी विजय
Shardul Thakur
मुंबई विरुद्धच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना शार्दुल ठाकुर!Pudhari photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळलेल्या आयपीएल २०२५ च्या १६ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक झळकावले, पण त्याच्या खेळीचे विजयात रूपांतर झाले नाही. एलएसजीच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत कमाल करत मुंबईच्या फलंदाजांना १९१ धावांवर रोखलं. मात्र या विजयाचा खरा हिरो ठरला 'शार्दुल ठाकूर'. तोच खेळाडू ज्याला आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने खरेदी करण्यास उत्सुकता दाखवली नव्हती.सामन्याच्या १९ व्या षटकात शार्दुलने केवळ ७ धावा देत सामना लखनौच्या बाजूने फिरवला आणि मुंबईच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं.

Shardul Thakur |  १९ व्या षटकात काय घडले?

मुंबई इंडियन्सच्या डावात, शेवटच्या २ षटकात एमआयला जिंकण्यासाठी २९ धावांची आवश्यकता होती. कर्णधार ऋषभ पंतने 19वे षटक शार्दुल ठाकूरकडे सोपवले. त्या षटकात त्याने फक्त ७ धावा दिल्या, ज्यामुळे सामन्याचा मार्ग बदलला आणि विजय लखनौच्या हाती पडला. त्याने १९ व्या षटकात मुंबईच्या फलंदाजांना चौकार किंवा षटकार मारण्याची एकही संधी दिली नाही. १९ व्या षटकातच तिलक वर्मा रिटायर्ड आऊट झाला. त्याच्या जागी मिचेल सँटनर मैदानात आला. तिलकने २३ चेंडूत २५ धावा केल्या. या हंगामात शार्दुल ठाकूरने ४ सामन्यांत एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार विकेट घेऊन शार्दुलने सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले.

Shardul Thakur |  हार्दिक आणि तिलक गोलंदाजांसमोर अडचणीत

मुंबई इंडियन्सना शेवटच्या १२ चेंडूत २९ धावांची आवश्यकता होती, त्यांच्या हातात ६ विकेट्स होत्या आणि कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा क्रीजवर होते. पण, शार्दुलने त्याच्या गोलंदाजीतील विविधतेमुळे हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यासह, त्याने षटकात फक्त ७ धावा दिल्या आणि सामन्याच्या शेवटच्या षटकात आवेश खानला वाचवण्यासाठी २२ धावा दिल्या. अवेश खानने षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला असेल, पण त्यानंतर त्याने हार्दिकला त्याच्या अचूक यॉर्करने पुन्हा हात उघडण्याची संधी दिली नाही. १९ व्या षटकाच्या जादू पूर्वीच, शार्दुलने सुरुवातीलाच संघाला यश मिळवून दिले होते. या अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाजाने डावाच्या तिसऱ्या षटकात सलामीवीर रायन रिकेलटनची विकेट घेतली. यामुळे मुंबई संघाने केवळ १७ धावांत आपले २ विकेट गमावले, ज्यामुळे नंतर आलेल्या फलंदाजांवरही दबाव निर्माण झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news