क्रीडामंत्र्यांनी फेटाळली पाकसोबत मालिकेची शक्यता | पुढारी

क्रीडामंत्र्यांनी फेटाळली पाकसोबत मालिकेची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तान जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि भारतात घुसखोरी थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही, असा निर्णय ‘बीसीसीआय’ने फार पूर्वीच घेतला होता, याचा पुनरूच्चार क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

चार दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर आणि पोलिस उपअधीक्षक शहीद झाल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट अजिबात खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीदरम्यान ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामने फक्त ‘आयसीसी’ टूर्नामेंटमध्येच होतात. याशिवाय या दोघांमध्ये बर्‍याच काळापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही.

Back to top button