पुढारी ऑनलाईन : चित्रपटात आणि खऱ्या आयुष्यातही डॅशिंग असणारे शत्रुघ्न सिन्हा है कायम चर्चेत असतात. अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणातही नशीब आजमावले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. यावरून शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य केले आहे.
एकूणच मीडिया आणि सोशल मीडियामधला फरक त्यांनी मांडला आहे. ते म्हणाले, विशेषतः कोरोनानंतर सोशल मीडियाची ताकद वाढली आहे. पारंपरिक मीडिया हा आता बराच मागे पडला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मताला मिळणारं महत्त्व ठाऊक आहे. यामुळेच सोशल मीडियाची ताकद वाढली आहे. सोशल मीडियावर कोणीही काहीही बोलू किंवा लिहू शकते आणि त्यांना आपण थांबवू शकत नाही.