![‘बवाल’ मुळे वरुण-जान्हवी चर्चेत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2F%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : 'दंगल' व 'छिछोरे' यासारखे ९ चित्रपट देणाऱ्या नितेश तिवारी यांचा 'बवाल' चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाला, त्याचवेळी चाहत्यांमध्ये वरुण धवन व जान्हवी कपूर यांची क्रेझ वाढली होती. वरुण व जान्हवी यांची प्रेमकहाणी दुसऱ्या महायुद्धाशी कसे जोडले गेले असेल, याचीही उत्सुकता होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वरुण व जान्हवी यांच्या परफॉर्मन्सची बरीच प्रशंसा झाली. कथेला देखील उत्तम रिस्पॉन्स मिळाला आहे.
'बवाल' चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असून वरुण धवनने उत्तम प्रतिसाद देणाऱ्या चाहत्यांचे आवर्जून आभार मानले आहेत. तो आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हणाला, 'अज्जू भैयाने उत्तम वातावरणनिर्मिती केली. 'बवाल'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजपर्यंतच्या वाटचालीत मला माझ्या अन्य कोणत्याही चित्रपटासाठी इतके फोन आले नाहीत. "