जेनिलिया देशमुख म्हणते, तो माझा निर्णय…

जेनिलिया देशमुख म्हणते, तो माझा निर्णय…

पुढारी ऑनलाईन : लग्न झाल्यानंतर मला कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य द्यायचे होते. तो पूर्णपणे माझा निर्णय होता, असा खुलासा जेनिलिया देशमुख हिने केला आहे. जेनिलिया देशमुख ही दाक्षिणात्य आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

रितेश देशमुख आणि जेनिलिया नुकतेच करिना कपूरच्या चॅट शो 'व्हॉट वुमन वॉन्ट' मध्ये सहभागी झाले होते. लग्न झाल्यानंतर रितेशने जेनिलियाला काम करण्यासाठी मनाई केली होती, अशी कुजबुज नेहमी असते. त्यावर जेनिलिया म्हणाली, लग्नाआधी मी हिंदी, तेलुगु, तमिळ सिनेसृष्टीत खूप काम करत होते. लग्रानंतर जेव्हा मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला, तेव्हा लोकांनी मला विविध प्रश्न विचारले. रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी माझी फिल्मी कारकीर्द संपवली; पण तसे काहीही झाले नाही. मी ठरवून काही दिवसांसाठी लांब होते. मलाच दीर्घकाळ मनोरंजन सृष्टीपासून ब्रेक घ्यायचा होता, असे तिने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news