पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या संपुर्ण इतिहासात पहिंल्यादाच मिड विक इविक्शन पार पडलं आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर झाल्या आहे. दिवसभरात सोशल मीडियावर अंकिता वालावलकर एलिमिनेट होईल अशी चर्चा होती. त्याप्रमाणे अंकिता एलिमिनेशनच्या अंतिम टप्प्यात होती. मात्र वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. आता यानंतर अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर असे सहा सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट ठरले आहेत. या सदस्यांपैकी निक्की तांबोळीने 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे ती यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली होती. (Big Boss Marathi Update)
निक्की पाठोपाठ प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार गायक अभिजीत सावंत या शोचा दुसरा फायनलिस्ट ठरला आहे. अभिजीत नंतर तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पोवारने ग्रँड फिनालेमध्ये दमदार एन्ट्री घेतली. यानंतर चौथ्या क्रमांकावर जान्हवी किल्लेकरने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. तर पाचव्या क्रमांकावर सूरज चव्हाण याने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मारली होती. टॉप-5 स्पर्धकांची घोषणा केल्यावर घरात मिडवीक एविक्शन पार पडलं. अंकिता आणि वर्षा बॉटम – 2 स्पर्धक होत्या. शेवटी ‘बिग बॉस’ने सहाव्या फायनलिस्टच्या नावाची घोषणा करत अंकिता वालावलकरचं नाव जाहीर केलं आणि वर्षा उसगांवकरांचा घरातील प्रवास 67 दिवसांनी संपला. अशाप्रकारे वंडर गर्ल वर्षा उसगांवकर यांनी घराचा निरोप घेतला. (Big Boss Marathi Update)