पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे, पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला आहे. सिनेमात दाखवलेल्या काही सीनमुळे विशिष्ट समुदायाने आक्षेप घेतला आहे. तसेच सेन्सॉर बोडनिही या सिनेमाला अद्याप प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे प्रदर्शनला अवघे पाच दिवस शिल्लक असताना 'इमर्जन्सी' ( Emergency Movie ) या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने कंगना संतप्त झाली आहे.
यावर एका मुलाखतीत कंगना म्हणाली, ''माझ्याच सिनेमावर खरेतर 'इमर्जन्सी' लावली आहे. यामुळे खूपच निराश झाली आहे. मला माझ्या देशाबद्दल निराशेची भावना दाटून आली आहे. आपण किती घाबरायचे? मी स्वाभिमानाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सेन्सॉर बोडनिही सिनेमाचे प्रमाणपत्र अडवले आहे, पण मला 'इमर्जन्सी' हा सिनेमा कोणत्याही कटविना प्रदर्शित करायचा आहे. याविरुद्ध कोर्टात जाऊन सिनेमाला एकही कट न देता मी प्रदर्शित करणात आहे.''
''सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या सुरक्षारक्षकाद्वारे केली गेल्याचे दाखवण्यात आले आहे. हा प्रसंग सिनेमात न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आहे.'' आता सिनेमा कोणत्या तारखेला रीलिज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.