सैफ अली खान हा बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने दिल चाहता है, हम तुम, तारा रम पम, एजंट बिनोद, विक्रम वेधा यासारख्या सिनेमांतून अभिनयाची छाप पाडली आहे. सैफने नुकतेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. 'देवरा-१' या सिनेमातून सैफ प्रमाणेच जान्हवी कपूरने ज्युनिअर एनटीआर दक्षिणेत पदार्पण केले आहे. सैफने एका मुलाखतीत सध्याच्या भारताच्या राजकारणावर भाष्य केले आहे. यावेळी सैफने सध्याचे भारतीय राजकारण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांच्याबाबतच्या प्रश्नावर खुलेपणाने उत्तरे दिली आहेत. त्यामुळे राजकारणात प्रवेश करणार आहे, याची चर्चा रंगली आहे. (Saif Ali Khan)
सैफ म्हणाला की, मला वाटते की आपल्या देशातील सर्वच राजकीय नेते प्रभावशाली आणि धाडसी आहेत. यात सर्वात अग्रक्रमाने नावे येते ते राहुल गांधी यांचे. राहुल गांधी यांनी ने काम केले आहे आणि ते करत आहेत, ते फारच कौतुकास्पद आहे. मला आठवतेय की, एक काळ असा होता की ज्यावेळी राहुल यांचे भाषण आणि त्यांच्या कामावर टीका केली जायची. पण, मेहनतीच्या जोरावर राहुल यांनी संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. मला राजकीय नेता बनण्यात काहीच रस नाही. मला एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर स्वतःचे मत मांडायचे असेल तरच मी राजकारणात येऊन नेता बनण्याचा विचार करेन. सैफचा 'देवरा पार्ट-१' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, यामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारत आहे.