'मंत्र्यांनीही मला साथ दिली नाही', तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्याशी तुलनेवर पवन कल्याण यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जन सेना पक्षाची स्थापना केली होती.
pawan kalyan react on people are compare him to vijay
pawan kalyan react on people are compare him to vijay became cmfile photo
Published on
Updated on

pawan kalyan react on people are compare him to vijay became cm actor says situation in andhra pradesh is different

पुढारी ऑनलाईन :

अलीकडेच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये जोसेफ विजय यांनी विजय मिळवत मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यांच्या चाहत्यांकडून अजूनही या विजयाचा जल्लोष सुरू आहे. दरम्यान, काही लोक पवन कल्याण यांची विजय यांच्याशी तुलना करत आहेत. यावर आता पवन कल्याण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

pawan kalyan react on people are compare him to vijay
Vijay thalapathy | तामिळनाडूचा थलैवा

मंगळागिरी येथील जन सेना पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणाले, “तमिळनाडूमध्ये निवडणुका झाल्यापासून आणि विजय मुख्यमंत्री झाल्यापासून लोक माझ्यावर दबाव टाकत आहेत. आपल्या शेजारच्या राज्यात एका अभिनेत्याने पक्ष स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवले. तेव्हापासून अनेक लोक मला संदेश पाठवत आहेत आणि म्हणत आहेत की मलाही आंध्र प्रदेशात असेच करायला हवे होते.”

आपली भूमिका स्पष्ट करताना पवन कल्याण यांनी तेलुगूतील एका म्हणीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “शेजाऱ्याच्या लग्नात उगाचच उत्साह दाखवण्यासारखी ही परिस्थिती आहे. लहान मुले इकडे-तिकडे धावत असतात, पण त्यांना हेच कळत नाही की ते त्यांच्या घरचे लग्न नाही. आंध्र प्रदेशातील परिस्थिती वेगळी आहे. मी २०१९ ची निवडणूक लढलो होतो. त्यातून काय झाले? मंत्र्यांनीसुद्धा मला साथ दिली नाही. त्यामुळे तुलना करू नका.”

चिरंजीवींनी विजय यांना दिल्या शुभेच्छा

दरम्यान, पवन कल्याण यांचे बंधू चिरंजीवी यांनी एक दिवस आधी विजय यांच्याशी फोनवरून मनमोकळी चर्चा केली होती. चिरंजीवी यांच्या टीमकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही चर्चा अतिशय मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण झाल्याचे म्हटले आहे.

pawan kalyan react on people are compare him to vijay
TN Politics : मुख्यमंत्रीपदाचे भाकित खरे ठरले, ज्योतिष्याचेच नशीब फळफळले! CM विजय यांच्या कार्यालयात मिळाले मोठं पद!

निवेदनात म्हटले आहे, “मेगास्टार चिरंजीवी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याबद्दल विजय यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी आशा व्यक्त केली की विजय हे जनतेच्या हितासाठी काम करणारे मुख्यमंत्री ठरतील आणि तमिळनाडूच्या लोकांच्या मनात कायम विशेष स्थान निर्माण करतील. तसेच महान नेते एमजीआर यांच्यासारखेच त्यांनाही जनतेचे प्रेम आणि स्नेह लाभो.”

पुढे असेही नमूद करण्यात आले की विजय यांनी चिरंजीवी यांचे आभार मानले. त्यांनी नुकताच ‘माना शंकरा वर प्रसाद गारू’ हा चित्रपट पाहिल्याचे सांगितले आणि मोठ्या पडद्यावर चिरंजीवी यांना पाहून आनंद झाल्याचे व्यक्त केले. तसेच ‘जन नायकन’ चित्रपटाच्या पायरसी प्रकरणात मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याशिवाय KVN प्रोडक्शन्सच्या आगामी चित्रपटासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

पवन कल्याण आणि विजय यांचे राजकीय प्रवास

पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जन सेना पक्षाची स्थापना केली. २०२४ च्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये जन सेना, टीडीपी आणि भाजप यांच्यात युती घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली, मात्र मोठे यश मिळवले. जन सेना पक्षाने लढवलेल्या २१ विधानसभा आणि २ लोकसभा जागांवर विजय मिळवला. त्यानंतर पवन कल्याण आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले.

दुसरीकडे, विजय यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने २३४ पैकी १०८ जागांवर विजय मिळवला. या दमदार कामगिरीनंतर विजय प्रथमच मुख्यमंत्री बनले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news