कैलाशने 39 वर्षांपासून मिठाई खाल्लेली नाही

कैलाशने 39 वर्षांपासून मिठाई खाल्लेली नाही
Kailash Kher
कैलाशने 39 वर्षांपासून मिठाई खाल्लेली नाहीinstagram
Published on
Updated on

कैलाश खैर हा एक दिग्गज गायक आहे, त्याने 'सय्या, मेरे निशान, जय जयकारा' अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. कैलाशने केवळ हिंदीच नाही, तर मराठी गाणीही गायली आहेत. कैलाशचा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे. एका मुलाखतीत कैलाशने गेल्या ३९ वर्षांपासून एकही मिठाई का खाल्ली नसल्याचा खुलासा केला आहे. कैलाशने मिठाई न खाण्यामागचे भावूक कारण सांगितलं. तो म्हणाला की, मी गेल्या ३९ वर्षांपासून एकही मिठाई खाल्लेली नाही. यामागे मधुमेह अथवा अन्य कोणतेही कारण नाही.

मी १२ वर्षांचा असताना माझ्या कुटुंबासोबत भांडण झाले होते. तुम्ही धुंकून चाटता, अशा शब्दात मी एकाला सुनावले होते. अवघ्या १२ वर्षांच्या माझ्या तोंडी असे अपशब्द ऐकून मला कुटुंबाने बेदम मारले होते. त्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आईने त्यांना विचारले की, तुला माझ्या हातचा कलाकंद, गाजरचा हलवा आवडतो, घर सोडल्यावर तुला मिठाई कशा खायला मिळणार? आईची ही गोष्ट ऐकून मी तिला म्हणालो की, आई मी तुझाच आहे. येथून पुढे मी मिठाई खाणार नाही. कोणत्याही गोड वस्तूला स्पर्श करणार नाही. अशा पध्दतीने मी १२ वर्षांचा असल्यापासूनच कोणतीही मिठाई खाल्लेली नाही. इतकेच नाही तर थंड आणि आंबटगोड पदार्थांचा आस्वाद घेतलेला नाही. मी खूप हट्टी आहे. एकदा ठरवले नाही तर नाहीच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news