पुढारी वृत्तसेवा - देराफेरी', वेराफेरी', 'फिर हेराफेरी', 'भागम् भाग', 'भूलभुलैया', 'खट्टा मिठा' यासारख्या अनेक सुपरहिट कॉमेडी चित्रपटांचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. त्यांच्या सिनेमात अक्षय कुमार असतो. २०१० मध्ये आलेल्या 'खट्टा मिठा' या सिनेमानंतर कोणताही नवा सिनेमा आला नव्हता. इतकी वर्षे दोघांनी एकत्र काम केले नव्हते; पण आता दोघे एकत्र काम करणार असल्याचे सांगितले जात असून, (Bhooth Bangla ) सुमारे १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अक्षय आणि प्रियदर्शन 'भूत बंगला' नावाच्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहेत. (Akshay Kumar and Priyadarshan reunite)
सोमवारी अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा करण्यात आली. यावेळी 'भूत बंगला' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये अंधारी काळ रात्र, चंद्र, जुना वाडा आणि दूध चाटणारा अक्षय बघायला मिळत असून, त्याच्या खांद्यावर काळी मांजर बसलेली दिसते. अक्षयचा नवीन लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 'भूत बंगला' हा सिनेमा नाताळ २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याने वर्षभर त्याची चाहत्यांना वाट पाहावी लागेल. एकता कपूरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात अक्षयसोबतच आणखी कोणते कलाकार झळकणार? याचा उलघडा लवकरच होईल, असे सांगण्यात आले.