Yo Yo Honey Singh : 'त्यावेळी खूपच स्वातंत्र्य' | पुढारी

Yo Yo Honey Singh : 'त्यावेळी खूपच स्वातंत्र्य'

पुढारी ऑनलाईन : शाहरूख खानच्या पठाण चित्रपटातील ‘बेशर्म ‘रंग’ या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. दीपिका पदुकोणने गाण्यात घातलेल्या बिकिनीच्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार ‘बेशर्म रंग’ या गाण्यावर रील बनवताना दिसत आहेत. आता या वादात गायक आणि रॅपर हनी सिंगने उडी घेतली आहे.

तो म्हणाला की, पूर्वी यापेक्षा जास्त स्वातंत्र्य होते. लोक थोडे कमी शिकलेले असायचे पण तेच जास्त समजूतदार होते. ते बौद्धिकदृष्ट्या हुशार होते आणि या गोष्टी ते मनोरंजन म्हणूनच घेत असत. त्यांनी कधीही काहीही मनावर घेतले नाही. रहमान सरांचे एक गाणे होते, ‘रुक्मणी रुक्मणी शादी के ‘बार क्या क्या हुआ’ लोकांनी हे गाणं स्वीकारले. पण जेव्हा मी असे गीत लिहिले तेव्हा लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. आता तर परिस्थिती आणखीच वाईट झाली आहे. लोक खूप संवेदनशील झाले आहेत. हे फक्त मनोरंजन आहे पण त्याकडे मनोरंजन म्हणून ते बघत नाहीत.

Back to top button