कमाल आहे ! कायद्यापुढे सगळे समान, तर मग तमाशा कशासाठी ? संजय राऊतांचा भाजपला टोला

कमाल आहे ! कायद्यापुढे सगळे समान, तर मग तमाशा कशासाठी ? संजय राऊतांचा भाजपला टोला
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यात खळबळ उडवून देणार्‍या फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस बजावली आहे.

या निर्णयाने भाजप विरुद्ध राज्य सरकार असा नवा सामना उभा राहण्याची चिन्हे आहेत. आधी फडणवीस यांना बीकेसीतील सायबर विभागाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. नंतर पोलिसांनीच माघार घेतली आणि फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, फडणवीस यांची चौकशी करण्यासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने भाजपचा तीळपापड झाला आहे.

राज्यभर या चौकशीविरोधात भाजपकडून निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान, या निदर्शनांवर संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कमाल आहे ! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का ?

दरम्यान, फडणवीस यांनी आपण रविवारी सकाळी 11 वाजता सायबर सेलच्या कार्यालयात हजर होणार असल्याचे जाहीर केले होते. तसे झाले असते, तर या कार्यालयाच्या बाहेर शक्तिप्रदर्शन करण्याची पूर्ण तयारी भाजपने केली होती. तो धोका लक्षात घेऊन गुन्हे विभागाचे सहपोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी स्वत: फडणवीस यांना फोन केला आणि तुम्ही सायबर सेलमध्ये येण्याची गरज नाही. आम्हीच आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी येत असल्याचे कळवले. फडणवीस यांनीही पोलिस ठाण्याला जाण्याचा निर्णय रद्द केला.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news