राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत असून संसदेचे कामकाज देखील या मुद्द्यावरून प्रभावित झालेले आहे. राहुल गांधी हे सातत्याने देशाला बदनाम करीत आहेत. आजच्या राजकारणातले ते मीर जफर आहेत. देशाच्या अंतर्गत बाबतीत विदेशी शक्तींनी हस्तक्षेप करावा, असे गांधी उघडपणे सांगतात. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशाविरोधात कट रचलेला आहे. गांधी हे संसदेच्या कामकाजात कमी सहभाग घेतात आणि त्याचवेळी संसदेत बोलू दिले जात नाही, अशी दुटप्पी भूमिका घेतात, असे पात्रा म्हणाले.