नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर मध्ये कुठल्याही क्षणी निवडणुका घेण्याची तयारी आहे, असे उत्तर केंद्र सरकारने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात दिले.यासंदर्भातील निर्णय केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगावर अवलंबून असल्याचे देखील केंद्राने स्पष्ट केले.अनुच्छेद ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केंद्राने ही माहिती दिली.