प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाचे निमंत्रण स्विकारले; पत्र लिहून म्हणाले, ‘मी…’

प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाचे निमंत्रण स्विकारले; पत्र लिहून म्हणाले, ‘मी…’
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोह उद्या पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. त्यांनी निमंत्रणानंतर यात्रेच्या समारोप सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण मला मिळाले असून, ते निमंत्रण मी स्वीकारले असल्याचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिलेले भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण मला मिळाले आहे. मी काल निमंत्रण स्वीकारले आहे आणि 17 मार्चला शिवाजी पार्क, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तसेच 17 मार्चला मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना राजगृह येथे भोजनाचे निमंत्रण आम्ही दिले आहे, अशा आशयाचे पत्र आंबेडकर यांनी ट्वीटवर पोस्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news