Rain Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा ऑरेंज अलर्टचा इशारा

Rain Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा ऑरेंज अलर्टचा इशारा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून पावसाची संततधार सुरु आहे. मात्र गेल्या दोन ते तीन  दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. आज (दि. १ ऑगस्ट) मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून पुन्हा काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिलेला आहे.

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र नागरिकांसाठी  एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news