रायपूर : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील बलोदाबाजार-भाटापारा रस्त्यावर रात्री उशिरा ट्रक आणि पिकअप व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील (साहू) 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. तीन जण अत्यवस्थ असून त्यांना रायपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अर्जुनी या गावातून एका कौटुंबिक कार्यक्रमातून खिलोरा या आपल्या गावासाठी परतताना हा अपघात झाला. मृतांमध्ये 4 मुले आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.