शेतकऱ्यांना मोठा दिलासा : 'पीएम आशा योजने'साठी ३५ हजार कोटींच्या निधीला मंजुरी

PM Aasha scheme | कृषी क्षेत्राला चालना केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
PM Aasha scheme
पंतप्रधान आशा योजनेसाठी ३५ हजार कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ३५ हजार कोटी खर्चासह प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA) योजनेला आज (दि. १८) मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना तेलबिया, कडधान्ये आणि इतर पिकांसह त्यांच्या उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमती (MSP) मिळतील, याची खात्री करून त्यांना अत्यंत आवश्यक किंमत स्थिरीकरण प्रदान करणे आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

पीएम आशा योजनेचे उद्दिष्ट काय ? 

भारत सरकारने प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सप्टेंबर २०१८ मध्ये जाहीर केलेली सर्वसमावेशक योजना आहे. पीएम आशा योजनेचे उद्दिष्ट पीक खराब झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा आहे.

PM Aasha scheme
मोठी बातमी! ‘वन नेशन वन इलेक्शन’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news