मणिपूर हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मागितला सीलबंद अहवाल

Manipur violence : राज्य सरकारने कोणती पावले उचललीत, याचाही मागितला खुलासा
Supreme Court
सर्वोच्च न्यायालयFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर सरकारकडून हिंसाचारामध्ये जाळलेल्या, लुटलेल्या, अतिक्रमण केलेल्या इमारतींचा तपशीलवार सीलबंद अहवाल मागितला आहे. या अहवालात त्या इमारतींचे मालक कोण आहेत आणि आता इमारतीवर कोणाचा ताबा आहे? याचा देखील तपशील असणे आवश्यक आहे.

सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने मणिपूर हिंसाचार प्रकरणी सुनावणी केली. इमारतींचा ताबा घेणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने कोणती पावले उचलली आहेत? हे देखील राज्य सरकारच्या अहवालात नमूद करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. न्यायमूर्ती गीता मित्तल समितीने सांगितल्याप्रमाणे तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी घरांसाठी निधी जारी करण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालय आता मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित खटल्याची सुनावणी २० जानेवारी २०२५ नंतर करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news