किरकोळ महागाई दरात डिसेंबरमध्ये ५.२२ टक्क्यांपर्यंत घसरण

सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी
Retail inflation rate
किरकोळ महागाई दरात डिसेंबरमध्ये ५.२२ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : डिसेंबर २०२४ मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.२२ टक्क्यांपर्यंत घसरला आणि चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. याचे मुख्य कारण नाशवंत अन्नपदार्थांच्या किमतीत झालेली घट असल्याचे मानले जाते. यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्न आणि पेय श्रेणीतील किरकोळ महागाईच्या दरात डिसेंबर महिन्यात घट दिसून आली. डिसेंबरमध्ये ते ७.६९ टक्क्यांवर आले. २०२४ मध्ये तो सातत्याने वाढत होता तर नोव्हेंबरमध्ये ते ८.२ टक्क्यांवर पोहोचला होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्के आणि डिसेंबर २०२३ मध्ये ५.६९ टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या सीपीआय आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई ८.३९ टक्क्यांपर्यंत घसरली. नोव्हेंबरमध्ये ९.०४ टक्के आणि डिसेंबर २०२३ मध्ये ९.५३ टक्के होती. डिसेंबर २०२४ मध्ये सीपीआय (सामान्य) आणि अन्न महागाई गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी आहे, असे एनएसओने म्हटले आहे.

गेल्या महिन्यात, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज ४.५ टक्क्यांवरून ४.८ टक्के व्यक्त केला होता. सीपीआयनुसार, जुलै-ऑगस्ट दरम्यान महागाई सरासरी ३.६ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये ५.५ टक्के आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ६.२ टक्क्यांपर्यंत वाढली. डिसेंबर २०२४ मध्ये घरांच्या महागाईचा दर दरवर्षीप्रमाणे आधारावर २.७१ टक्के होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये चलनवाढीचा दर २.८७ टक्के होता. गृहनिर्माण निर्देशांक फक्त शहरी भागासाठी संकलित केला जातो. डिसेंबर २०२४ मध्ये भाज्या, डाळी, साखर आणि मिठाई आणि धान्य उत्पादने इत्यादींमध्ये महागाईत लक्षणीय घट दिसून आली आहे.

डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई दर वार्षिक ८.३९ टक्क्यांनी वाढला. तर मागील महिन्यात ९.०४ टक्के आणि मागील वर्षीच्या याच कालावधीत ९.५३ टक्के वाढ झाली होती. ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य महागाई १०.८७ टक्के, सप्टेंबरमध्ये ९.२४ टक्के आणि ऑगस्टमध्ये ५.६६ टक्के झाली. ऑक्टोबरमध्ये भारतातील किरकोळ महागाईचा दर १४ महिन्यांच्या उच्चांकी ६.२ टक्क्यांवर पोहोचला. तर अन्नधान्य महागाई दर १५ महिन्यांच्या उच्चांकी १०.९ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या काही महिन्यांत अन्नधान्याच्या किमतींमुळे महागाई वाढली आहे, भाज्यांच्या किमतींमध्ये सतत होत असलेली वाढ हे याचे मुख्य कारण आहे.

ग्रामीण भागातील महागाईतही घट

नोव्हेंबरमध्ये ग्रामीण महागाई दर ५.९५ टक्क्यांवरून ५.७६ टक्क्यांवर आला. डिसेंबर २०२३ मध्ये ग्रामीण भागातील महागाई ५.९३ टक्के होती. त्याच वेळी ग्रामीण भागात भारतीय अन्न महागाईतही घट नोंदवली गेली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये अन्नधान्य महागाई ९.०३ टक्के होती. तर नोव्हेंबर २०२४ मध्ये वाढून ९.१० टक्के झाले. परंतु डिसेंबर महिन्यात ते ८.६५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news