

Relationship Tips
नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत जे कपलच्या लॉयल्टीवर आधारित आहेत. हे चित्रपट पाहण्याचा एक फायदा असा आहे की तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय की नाही, हे शोधण्यास मदत होते. (Relationship Tips)
विवाहित असा किंवा रिलेशनशिपमध्ये, लॉयल्टी तपासणारे चित्रपट पाहण्यात काही गैर नाही, कारण आजकाल कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही. कारण आता तर सोशल मीडियावर रिलेशनशिप्सबद्दल इतका गोंधळ पसरला आहे की, लोकांचे सुखी संसारे देखील तुटत आहेत. आज अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही शोधता येईल की, तुमचा पार्टनर, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड तुमच्यापासून लपवून काही चुकीच तर करत नाहीये ना!
या चित्रपटाचे नाव 'लवयापा' आहे, जो याच वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी, ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनेद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले होते. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, ती दिल्लीत राहणाऱ्या गौरव (जुनेद) आणि बानी (खुशी) नावाच्या कपलवर आधारित आहे. हे दोघे इंस्टाग्रामवर भेटतात आणि बऱ्याच काळापर्यंत एकमेकांना डेट करतात. या काळात ते एकमेकांना जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री जुळते, पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात असा ट्विस्ट येतो की त्यांचे 'बाबू-शोना'वाले प्रेम भांडणांमध्ये बदलून जाते.
जेव्हा त्यांचे प्रेम लग्नाच्या टप्प्यावर येते, तेव्हा बानीचे वडील त्यांच्यासमोर एक विचित्र पण महत्त्वपूर्ण अट ठेवतात. अट अशी असते की दोघांनाही २४ तासांसाठी एकमेकांचे मोबाईल फोन बदलायचे असतात. जरी हे करणे दोघांसाठी कठीण होते, तरीही दोघांनी लग्नासाठी ही अट मान्य केली. मात्र, पुढील २४ तासांत त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेसमुळे दोघांनाही एकमेकांचे अनेक लपवलेली रहस्य कळू लागतात. या मेसेजेसमुळे दोघांमधील 'बाबू-शोना'वाले प्रेम क्षणार्धात भांडणात बदलून जाते. या ट्विस्टमुळे प्रेमातील विश्वास आणि निष्ठेची खरी परीक्षा होते.
रोमांस, ड्रामा आणि कॉमेडीचा योग्य समन्वय असलेला हा चित्रपट, साऊथचा हिट चित्रपट 'लव्ह-टुडे' चा हिंदी रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या काळात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे किती धोक्याचे असू शकते, हे या चित्रपटातून स्पष्ट करण्यात आले आहे.