नवी दिल्ली : लोकसभेत एनडीए सरकारवर हल्लाबोल करण्याचा लगाम राहुल गांधी यांच्या हाती राहणार आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते लोकसभेत पुढच्या रांगेत बसले होते, यावरून त्यांनी स्वतःच आपण विरोधी पक्षनेते होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहेत. शिवाय सरकारच्या अनेक महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमध्येही विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. राहुल गांधीही या संधीचा चांगला उपयोग करतील.