Parliament Monsoon Session | संरक्षण मंत्र्यांना बोलू दिलं, मग विरोधी पक्षनेता असुनही मला का बोलू दिलं जात नाही? राहुल गांधींचा सवाल

Parliament Monsoon Session | गोंधळानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
rahul gandhi
rahul gandhi Pudhair
Published on
Updated on

Parliament Monsoon Session 2025 updates

नवी दिल्ली : संसदेत आजपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप केला की, सत्ताधारी भाजपकडून केवळ आपल्या मंत्र्यांनाच बोलण्याची संधी दिली जाते, तर विरोधकांचा आवाज दडपला जातो.

"मी विरोधी पक्षनेता आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे. पण मला बोलू दिलं जात नाही. संरक्षणमंत्र्यांना संधी दिली जाते, पण आम्हाला नाही," असं राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. "पंतप्रधान मोदी तर एका सेकंदात सभागृहातून बाहेर पडतात. ही नवी पद्धत आहे," अशी टीकाही त्यांनी केली.

rahul gandhi
Parliament Monsoon Session | संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरुन गोंधळ; पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी फरार असल्यावरून खरगे आक्रमक

सभागृहात गोंधळ – दोन्ही सदने 2 वाजेपर्यंत तहकूब

पहिल्या दिवशीच लोकसभा व राज्यसभेत विरोधकांनी घोषणाबाजी करत पहलगाम दहशतवादी हल्ला व ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या.

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चेसाठी वेळ दिला जाईल, असं आश्वासन दिलं. मात्र त्याआधीच विरोधकांचा आक्रोश आणि सरकारकडून दुर्लक्ष यामुळे वातावरण तापलं.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. पण घोषणाबाजीच्या गोंधळात त्यांचे वक्तव्य ऐकलेही गेले नाही, अशी परिस्थिती होती.

राहुल गांधींचा रोखठोक सवाल

राहुल गांधी म्हणाले, “कायद्यानुसार, सरकारकडील मंत्र्यांना जसे बोलू दिलं जातं, तसंच विरोधकांनाही बोलण्याचा अधिकार आहे. पण आता हे नवं चित्र आहे – सरकार फक्त तुम्हालाच बोलू देतं.”

rahul gandhi
Obama arrest video | व्हाईट हाऊसमध्ये FBI एजंट आले अन् बराक ओबामा यांना कॉलर धरून घेऊन गेले; ट्रम्प हसत राहिले... पाहा व्हिडीओ

रवि किशन यांचा विरोधकांवर पलटवार

भाजप खासदार रवि किशन यांनी विरोधकांवर टीका करत सांगितलं की, “संसदेचा पहिलाच दिवस असूनही विरोधक केवळ राजकारण करत आहेत. विकासावर बोलायला काही नाही, म्हणून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा मागतात. यातून त्यांच्या राजकारणातील पोकळपणा उघड होतो.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news