नवी दिल्ली :देशातील दोन बलाढ्य कंपन्यांनी पाठोपाठ बिलदरवाढ केल्याने जुलै महिन्यापासून मोबाईल बिल वाढणार आहे. टेलिकॉम कंपन्यांनी ५-जी वर केलेली गुंतवणूक, त्या तुलनेत स्थिर असलेले दरडोई उत्पन्न यामुळे मोबाईल दरात वाढ करण्यात आली आहे.
सर्वांत मोठी ग्राहकसंख्या असलेल्या जिओने विविध प्लॅनमध्ये १२ ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. पाठोपाठ एअरटेलने विविध प्लॅनमध्ये १० ते २१ टक्के दरवाढ जाहीर केली.
एअरटेलने अमर्यादित व्हॉईस आणि दैनंदिन डेटा प्लॅनमध्ये दर समायोजित केले आहेत. अमर्यादित व्हॉईस प्लॅन्सच्या किमतींमध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचे दर १७९ ते १९९, ४५५ ते ५०९ आणि १,७९९ ते १,९९९ पर्यंत असतील. दैनंदिन डेटा प्लॅन श्रेणीमध्ये ४७९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ५७९ रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ २०.८ टक्के आहे.