लखनौ : उत्तर प्रदेशातील नेपाळला लागून असलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम असून, राप्ती नदी, बुढी राप्ती आणि कुनो या तीन नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत पाऊस, पुरामुळे विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व 6 जण बुडून मरण पावले आहेत, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे सांगण्यात आले.
गोरखपूर, सिद्धार्थनगर आणि गोंडा जिल्ह्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे. बिहारमध्येही बेतिया, बगहा, सीतामढी, मधेपुरा, अररियासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे.