कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र : डॉ. नीलम गोऱ्हे

Marathi Sahitya Sammelan| ‘ मराठी साहित्य संवर्धनासाठी विविध उपक्रम महत्त्वाचे
Dr. Neelam Gorhe
डॉ. नीलम गोऱ्हे
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी "कवी कट्ट्याचे" उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याचा मागील काही वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला आणि मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात कवी कट्ट्याचा मागील काही वर्षांचा प्रवास, मराठी भाषा, साहित्य, आणि मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या संघर्षाचा उल्लेख केला. कवी कट्ट्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी मंडपाचा आकार वाढवत न्यावा लागतो, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. महिला आणि साहित्य यांचा परस्पर संबंध, साहित्यिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही त्यांनी प्रकाश टाकला.

साहित्यिक चळवळींना बळ देण्याचा संकल्प

महिलांचे साहित्य संमेलन आणि बालकवी संमेलन आयोजित करणे, सर्व कवींना एकत्र आणणारे अखिल भारतीय कवी संमेलन भरवणे, विद्यापीठांच्या धर्तीवर साहित्य विश्वात माजी कवी-सदस्य संकल्पना राबवणे, असे काही महत्वाचे प्रस्ताव डॉ. गोऱ्हे यांनी मांडले. काही कविताही त्यांनी सादर केल्या. तसेच ग्रंथनगरीला भेट देऊन प्रकाशक, लेखक आणि वाचकांशीही त्यांनी संवाद साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news