दिल्लीसह उत्तर भारतातील ८ राज्यांमध्ये दाट धुके, कानपूरमध्ये शून्य दृश्यमानता

North India Weather | धुक्‍याचा सर्वाधिक परिणाम उत्तरप्रदेशमध्ये
North India Weather
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी सतत वाढत आहे. घसरत्या तापमानाबरोबरच दाट धुके पसरत आहेत. उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी हवामान खात्याने दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. धुक्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर प्रदेशात दिसून आला. कानपूरमध्ये शून्य दृश्यमानता आणि लखनऊमध्ये ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे. बिहारच्या पूर्णिया, पंजाबच्या भटिंडा, हरियाणाच्या सिरसा आणि मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये ५०० मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदवण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेली बर्फवृष्टी बुधवारी थांबली आहे. श्रीनगरचे तापमान ४५.७ अंशांवर नोंदवले गेले आहे. शोपियान हा देशातील सर्वात थंड जिल्हा आहे. येथील तापमान उणे ३.९ अंश नोंदवले गेले. दुसरीकडे, राजस्थानमधील सीकरमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण भारतात थंडीचा कमी प्रभाव, पावसाची शक्यता

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव उत्तर भारतातील राज्यांपेक्षा कमी आहे. हवामान खात्याने दक्षिण भारताला पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, लक्षद्वीप व्यतिरिक्त अंदमान-निकोबार, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही पाऊस अपेक्षित आहे. आसाम आणि मेघालयमध्येही गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news