

नवी दिल्ली: 'कॉक्रोच जनता पार्टी'द्वारे नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेने, आपल्याला बलात्कार आणि अपहरणाच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर याचिकेचा तोंडी उल्लेख केला.
सरन्यायाधीशांनी याचिका मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी आंदोलनाशी संबंधित इतर प्रकरणांसोबत सुनावणीसाठी घेण्याचे मान्य केले. " याचिकाकर्त्या महिलेला बलात्कार आणि अपहरणाच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत," असे वकिलांनी न्यायालयाला सांगितले. "आम्ही मंगळवारी इतर प्रकरणांसोबतच हे प्रकरण सुनावणीसाठी घेऊ," असे सरन्यायाधीशांनी सांगितले.