अनेकदा माणसाला शारीरिक आजार झाल्यानंतर आपण रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार घेतो. मात्र मानसिक आजार या विषयावर ग्रामीण भागात बोलल्या जात नाही. ग्रामीण भागातील तरुणांच्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, तेही मानसिक आजारातून जातात. मात्र त्यांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यावर बोलले पाहिजे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी ते प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत, असा प्रयत्न या माध्यमातून 'तो राजहंस एक' या नाटकाची चमू करत असल्याचे अभिनेत्री आणि या नाटकातील कलाकार अनिता दाते यांनी सांगितले.