नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चांद्रयान मिशनच्या यशाने अवघ्या देशाची मान जगभरात उंचावली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करणारे भारत हे पहिले राष्ट्र ठरले आहे. नवीन स्पेस क्षेत्रातील साहसीपूर्ण प्रदीर्घ प्रवास भारताच्या खगोलीय महत्वाकांक्षांना नवीन उंचीवर नेणारे आहे, अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. भारतीय कंपन्यांसाठी अंतराळातील प्रवेशद्वार उघडल्याने देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.