गेल्या वर्षभरात देशात गव्हाचे दर किरकोळ बाजारात ६.७७ टक्क्यांनी तर घाऊक बाजारात ७.३७ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे या काळात किरकोळ बाजारातील तांदळाच्या दरात १०.६३% आणि घाऊक बाजारात ११.१२ टक्क्यांची वाढ झाली.
देशातील १४० कोटीहून अधिक नागरिकांच्या हिताचा विचार करुन केंद्र सरकारने ओएमएसएस (डी) अंतर्गत खासगी संस्थांना गहू आणि तांदूळ विक्रीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे, या धान्यांची उपलब्धता वाढेल, बाजारभावातील वाढ आटोक्यात राहील आणि अन्नधान्याच्या महागाईवर नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे.