परिषदेचे उदघाटन करतांना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.लागवड खर्च कमी करीत उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या सूचना यावेळी कृषी मंत्र्यांनी दिल्या. शेतीत 'नफा हमी' काळजी गरज आहे. तंत्रज्ञान वापरामुळे शेती फायदेशीर ठरू शकते.शेतीत फायदा झाला नाही तर, येत्या काही वर्षात तरुण पिढी शेती कडे वळणार नाही, अशी चिंता तोमर यांनी व्यक्त केली.