![राष्ट्रवादी काँग्रेस](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आज (दि.१६) जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आज जाहीर केलेल्या कार्यकारणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना राष्ट्रीय कार्यकारणीतून डच्चू देण्यात आला आहे. १०-११ सप्टेंबरला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्य़क्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून नवाब मलिक यांनी काम केले. मात्र आज जाहीर झालेल्या कार्यकारणीतून त्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटनीसपदी निवड करण्यात आली आहे.
शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय इतर ७ नेत्यांची राष्ट्रीय सरचिटनीसपदी निवड करण्यात आली आहे. सुनील तटकरे, योगानंद शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, वाय. पी. त्रिवेदी, एस. आर कोहली या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटनीसपदी निवड करण्यात आली आहे.