मी ऑगस्टमध्ये बाहेर पडेन आणि राज्यात वादळ निर्माण करेन : उद्धव ठाकरे | पुढारी

मी ऑगस्टमध्ये बाहेर पडेन आणि राज्यात वादळ निर्माण करेन : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऑगस्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. संपूर्ण राज्यात वादळ निर्माण करू, असे उद्धव यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच शिनसेना पक्षप्रमुखांची मुलाखत संजय राऊत यांनी सामनामध्ये घेतली आहे. ती मुलाखत आज प्रदर्शित करण्यात आली.

संजय राऊत यांनी मुलाखती दरम्यान उद्धव यांना प्रश्न विचारला की ते कधी बाहेर पडणार? या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव म्हणाले मी ऑगस्टमध्ये बाहेर पडेल. जिल्हाप्रमुखांना काही सूचना दिल्यात, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी. हे मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे. आता आदित्य फिरतोय. एका एका टप्प्याने जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी राज्यात फिरायला लागेन तेव्हा त्यात या लोकांना येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून मी तेवढ्यासाठी थांबलोय. एकदा ही नोंदणीची कामं होऊ द्या. मग मी बाहेर पडेन. सगळे नेते माझासोबत फिरतील. अख्ख्या राज्याचा दौरा होईल. राज्यात वादळ निर्माण करू, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

यावर संजय राऊत यांनी पुन्हा प्रश्न केला शिवसेनेचे तुफान पुन्हा येईल का?

त्यावर उद्धव म्हणाले करावेच लागेल. लोकांच्या मनात हृदयात शिवसेनेचे तुफान आहेच. त्यामुळे शिवसेनेचे तुफान नक्कीच पुन्हा येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Back to top button