‘आधी कुंभमेळा, आता चारधाम, लोकांच्या जीवाशी का खेळताय?’

Published on
Updated on

डेहराडून : पुढारी ऑनलाइन

आधी कुंभमेळ्यात साधूंना येण्याची परवानगी दिली आता   चारधाम यात्रेला परवानगी. आपण स्वत:च खजील व्हावं अशा गोष्टी का करता? . तुम्ही कोर्टाला फसवू शकता, पण लोकांना फसवू शकत नाहीत. राज्य सरकार लाखो लोकांच्या जिवाशी खेळत आहे. राज्य सरकार या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे?' अशा कडक शब्दांत उत्तराखंड हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.  

कुंभमेळ्याच्या आयोजनानंतर उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट असतानाही कुंभमेळ्याच्या आयोजनाला परवनगी दिली. आता चारधाम यात्रेलाही परवनगी दिल्याने कोर्टाने चांगलेच वाभाडे काढले आहेत. 

धार्मिक कार्यक्रमांना होत असलेल्या गर्दीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ताशेरे ओढले असून 'तुम्ही कोर्टाला फसवू शकता, पण लोकांना नाही. हेलिकॉप्टर घ्या, जा आणि बघा केदारनाथ-बद्रीनाथला काय सुरू आहे.', अशा शब्दांत फटकारले आहे.

वाचा :  देशातील कोरोनाचे मृत्यू तांडव सुरुच; गेल्या २४ तासात ४ हजार १९२ जणांचा बळी

कोर्टाने उत्तराखंड सरकारने या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद केले आहे. 'आधी तुम्ही कुंभमेळ्याची चूक केली. आता चारधाम यात्रा सुरू आहे. राज्य सरकारचे या सगळ्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. जा आणि बघा काय घडतंय. केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांमधल्या व्हिडिओमध्ये साधू कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. प्रार्थना करण्यासाठी का असेना, पण तुम्ही २३ साधूंना एकाच वेळी मंदिरात प्रवेश नाही देऊ शकत. हेलिकॉप्टर घ्या आणि जाऊन बघा काय घडतंय बद्रीनाथ-केदारनाथमध्ये", अशा शब्दांत सरकाला फटकारले आहे. 

वाचा : आता म्युकर मायकोसिसशी लढण्यासाठी मोदी टाळ्या,थाळ्या वाजवायला लावतील : राहुल गांधी

राज्य सरकारने या सगळ्या प्रकारात घेतलेल्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. 'जेव्हा राज्यातील जनतेसोबत काय सुरू आहे याविषयी विचारणा केली जाते, तेव्हा आम्हालाच लाज वाटते. आम्ही काय सांगणार? याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नाही. ते सरकारचं काम आहे. तुम्ही कोर्टाला फसवू शकता, पण लोकांना फसवू शकत नाहीत. राज्य सरकार लाखो लोकांच्या जिवाशी खेळत आहे. राज्य सरकार या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे.' १ एप्रिल ते ७ मे या कालावधीमध्ये तब्बल १ लाख ३० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.उत्तराखंडमध्ये तब्बल ८०६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ही रुग्णवाढ १८०० टक्क्यांनी वाढली आहे. 

वाचा : देशातील कोरोनाचे मृत्यू तांडव सुरुच; गेल्या २४ तासात ४ हजार १९२ जणांचा बळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news